सारंखं वाटतं काहीतरी लि हावं
नवीन,वेगळं,सुंदर,छानसं
जे वाचल्यावर जाणवेल पुन्हा
मनातलं,खोलवर लपलेलं काहीसं
बरेच विचार येत असतात पण
लि हावेत असं वाटतच नाही
अनुभवलेलं असतं बरच पण
कागदावर ते पहावंच वाटत नाही
जुने दि वस जुने मैत्रच
अजुनही रुंजी घालतात मनात
फ़ार मागे राहीलय ते सारं
हे अजुनही येतअ नाही ध्यानात
स्पर्धेनं भारलेल्या या जगात
भावनेनं भारलेलं काही का नाही सुचत?
सग्ळ्या आपल्या माणसांमध्ये
कोणी "माझं" का नाही दि सत?
-aditi
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
deadly!!! simply awesome!
lay bhari...
touchy..
Post a Comment