Thursday, August 16, 2007

होरपळ

हक्क येतो तिथे संपतं म्हणे नातं
मग हक्काचं नातं असतं ते कोणतं?
विश्वासाला गेलेत संशयाचे तडे
का झुगारुन देउ नये असं हे नातं?

विचारलेल्या प्रश्नांचे हेतु वेगळेच असतात
दिलेल्या उत्तरांचे अर्थ मग वेगळेच निघणार
द्रुष्टी कळते तसे विचार नाही कळत
असंच चालू राहीलं तर हातात काय उरणार?

विशास म्हणजे दोन चाकांची गाडी
असं म्हणणं असतं बर्याच जणांच
प्रत्यक्शात ईथे एकाने वेगात पळताना
दुसर्याने केवळ फ़रपटत रहायचं...

-aditi

3 comments:

ओहित म्हणे said...

ओ ताई ... टोन बदलला की तुमचा अचानक!

खरं सांगावे तर ... नात्यात हक्क असतोच. हक्कशिवाय नातं पुर्ण कसे होईल? पण कदाचीत जेव्हा हा हक्क ईतराना दिसू लागतो ... तेव्हा खेळाचे नियम बदलतात!

एकाने विचारवे की आज सिनेमा बघायचा मूड आहे ... येशील काय? माहीतही असेल जरी की आज तोच्याकडे पाहूणे येणार आहेत. आणि मग तिने हळूच पाहूण्यांची वेळ बदलून त्याच्याबरोबर जावे! हक्क हा असा असावा! त्याने तिला कधीही काहीही विचारायचा ... आणि तिलाही काहीही ऊत्तर द्यायचा.

What say?

@sh said...

lay confusing kavita aahe haan... nice attempt.. fultus palti from the previous one..

Drushti kalte - do you mean bhavana kaltat?

2-3 divas busy hoto.. mnanoon comment takla nahi..

HAREKRISHNAJI said...

खुप सुरेख कविता .

प्रत्यक्शात - क्ष असे लिहा - kSha.